पुलाचे काठ तुटल्याने अनियंत्रित दुचाकी कोसळून दोन मित्रांचा मृत्यू

0
7

जळगावात एका अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. गावात असलेले लग्न कार्यासाठी जात असताना या दोन युवकांवर काळाने घाला घातला. यात रस्त्यावर असलेल्या पुलावर दुचाकी अनियंत्रित होऊन कठडा तोडून थेट पुलाच्या खाली कोसळली. यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.

भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर हा अपघात घडला. संतोष भिल (वय 35) व गोकुळ रमेश सोनवणे (वय 35) असे अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत.गावातील एका लग्नाला जात असताना दुचाकी पुलाचे कठडे तोडून खाली गेल्याने दोघेही पुलाच्या खाली पडले. यात संतोष भिल याचा जागीच मृत्यू झाला होता. तर गोकुळ सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता. (Jalgaon) जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here