कोंबड्याला वाचवण्याच्या नादात तिघांचा बळी

0
2

तुम्ही कधी विचार केला आहे की, कोंबडा एखाद्याचा जीव घेऊ शकतो? किंवा कोंबड्यामुळे कोणाचा मृत्यू होऊ शकतो? नाही ना? मात्र आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका कोंबड्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आसाममधील कछार जिल्ह्यातील लखीमपूर भागात ही घटना घडली आहे.

अहवालानुसार, एक कोंबडा विहिरीत पडला होता. त्याला वाचवण्यासाठी घरातील लहान मुलाने विहिरीत उडी घेतली. बराच वेळ तो बाहेर न आल्याने मोठ्या भावानेही पाण्यात उडी मारली. मात्र तोही बाहेर न आल्याचे पाहून एक स्थानिक मुलगाही विहिरीत गेला. या तिघांचाही बराच वेळ कोणताही मागमूस न लागल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस-प्रशासनाने एसडीआरएफला पाचारण केले. यानंतर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये टीमने विहिरीतून तिघांचे मृतदेह बाहेर काढले. माहितीनुसार, विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून तिघांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे एका कोंबड्याला वाचवण्याचा नादात तीन लोकांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here