संजय राऊत यांनी ‘आघाडीचा पंतप्रधान’ म्हणून घेतल ‘या’ व्यक्तीच नाव

0
7
xr:d:DAGBJXOo-XE:2,j:3944450852079375657,t:24040106

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पैशाचं अमाप वाटप करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कितीही पैसा वाटला तरी त्यांना राज्यात यश मिळणार नाही, असं सांगतानाच सत्य बोलल्याबद्दल या देशात कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागतं किंवा तुरुंगात तरी पाठवलं जातं. पण 4 जूननंतर चक्र उलटं फिरणार आहे हे लक्षात घ्या. चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही. आम्हाला भीती नाही, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. मी दैनिक सामनात जे लिहितो तो सत्याचा आधार असतो. म्हणून तुम्ही माझ्याशी चर्चा करता. महायुतीत पाडापाडीचा खेळ झाला आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची लढाई भाजपसोबतच होती. आम्ही भाजपचा पराभव करत आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी देशाची चॉईस

इंडिया अलायन्स जिंकत आहे. 4 जून रोजी 12 वाजल्यानंतर तुम्हाला कळेल इंडिया अलायन्सचाच पंतप्रधान होणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे त्यांची चॉईस असल्याचं सांगितलं. मीही सांगतो, संपूर्ण देशाची चॉईस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत. आम्ही सर्व राहुल गांधी यांच्या पाठी उभे राहू. राहुल गांधींनी देशात ज्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, त्याला तोड नाही. देशानं राहुल गांधींना स्वीकारलं आहे. राहुल गांधींचं नेतृत्व जनतेने स्वीकारलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here