भीषण अपघात, चारचाकी खड्ड्यात पडल्याने १५ मजूर ठार

0
3

छत्तीसगडच्या कावर्धा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. कुकडूर पोलीस ठाणे क्षेत्रातील बहपनी गावाजवळ पिकअप ट्रक खड्ड्यात पडल्याने १५ मजूर ठार झाले आहेत. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पिकअप ट्रकमध्ये तेंदूपत्ता गोळा करून परतत असलेले २५ मजूर होते. ट्रक खड्ड्यात पडल्याने २५ जण खड्ड्यात पडले. यामध्ये १४ महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला. तर आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली.

या घटनेवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “कावर्धा, छत्तीसगड येथे झालेला रस्ता अपघात अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here