![पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेजण वाहून गेले](https://mandeshexpress.com/wp-content/uploads/2024/05/पाण्याचा-अंदाज-न-आल्याने-चौघेजण-वाहून-गेले.jpg)
कोल्हापूर : कागल तालुक्यातील आनूर – बस्तवडे बंधाऱ्यांमध्ये बुडून चौघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध सुरु आहे. या घटनेने कागल तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
या घटनेमध्ये जितेंद्र विलास लोकरे ( ३६, मुरगुड), त्याची बहीण रेश्मा दिलीप येळमल्ले ( ३४, अथणी, कर्नाटक), मामाची मुलगी सविता अमर कांबळे ( २७, रूकडी, हातकणंगले ) यांचा मृत्यू झाला आहे. तर भाचा हर्ष दिलीप येळमल्ले ( १७, अथणी) याचा शोध घेतला जात आहे.
दूधगंगा नदीच्या बस्तवडे बंधाऱ्याजवळ नदीत पोहण्यासाठी आज दुपारी काहीजण नदीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेजण वाहून गेले. त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. नदीवर कपडे धुण्यासाठी काही लोक आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील चौघेजण वाहून गेले. आरडाओरडा ऐकून त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी नदीत उडी घेऊन त्यातील तिघांना काही अंतरावर जाऊन काढले. एकजण बराच दूर गेल्याने हाती लागू शकला नाही.