घाटकोपर बॅनर दुर्घटनेतील 17 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

0
1

घाटकोपर बॅनर दुर्घटनेत 17 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिंडेला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या जयपूरमधून भावेशच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं कार्यरत होती, वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु होता, तो राज्याबाहेर पळाल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, पोलिसांनी शोधमोहिम राबवली होती आज पोलिसांनी भिंडेला राजस्थानमधून अटक केली आहे.

मुंबईतील घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला होता, पण अखेर मुंबई पोलिसांचे पथक भिंडेच्या मुसक्या आवळण्यात यशस्वी ठरले आहे. पोलीस पथक मागावर असल्याचे समजताच, पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच भावशने आपला मोबाईल बंद केला, त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, पोलिसांनी त्याला जयपूरमधून अटक केली आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा जीव गेला असून 75 जण जखमी झाले आहेत.

सोमवारी सायंकाळी मुंबईत जो सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात, आशियातील सर्वात मोठ होर्डिंग अशी नोंद असलेलं घाटकोपर पूर्व द्रुतगती महामर्गावरील होर्डिंग थेट नजीकच्या पेट्रोल पंपावरच कोसळले. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर 75 जण जखमी झाले होते. जखमींवर नजीकच्या रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली. ज्या इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट होतं त्याचा मालक भावेश भिंडेचा मुंबई पोलीसांची सात पथक शोध घेत त्याला राजस्थान मधून अटक करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here