
माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथे गेल्या पाच दिवसापासुन सुरु असणारे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामात झालेल्या गैरपरकारबाबत सुरु असणारे उपोषण अखेर पाचव्या दिवशी तात्पुरते स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत असल्याने आणि माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या मध्यस्तीने हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, तहसीलदार मनोजकुमार एतवडे, पोलीस निरीक्षक विनय बहिर, यु, टी जाधव,विष्णू अर्जुन, जयवंत सरगर, प्रणव गुरव, जगन्नाथ पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते. उपोषणकर्त्यांमध्ये शेखर रणदिवे, नवनाथ रणदिवे, बळीराम रणदिवे, अशोक पवार, आणि राहुल बुधावले यांनी लिबू सरबत घेऊन उपोषण सोडले.
उपोषणकर्त्यांनी उपअभियंता शिवाजी पाटील आणि यांचे सहकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला असून त्यांचे निलंबन करण्याची ठाम मागणी केली आहे. याच शिवाय त्यांचे सर्वेसवा असणारे हणमंत गुणाले यांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. आटपाडी तालुक्याचे पाणी सांगोला तालुक्याला वळविण्यात आल्याचा आरोपही केला आहे.
उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे.