सख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.

0
1

माणदेश एक्सप्रेस न्युज : पुणे : पुणे तालुक्यातील शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला आलेल्या दोन शाळकरी सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघे, रा. राहू, ता. दौंड) अशी मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

मृत आर्यन व आयुष हे दोघे मंगळवारी (दि. २१) पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे सुट्टी लागल्याने आले होते. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास घराशेजारी असलेल्या भाऊसाहेब बापू जाधव यांच्या शेततळ्याजवळ खेळत खेळत गेले. दोघांनी कपडे काढून शेततळ्यात उडी मारली. परंतु, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.

शेततळ्याच्या शेजारीच शेळ्या चारत असलेले त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी घटना पाहिल्यावर मदतीसाठी आवाज दिला. दोघांना पाण्या बाहेर काढले. परंतु, दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here