
माणदेश एक्स्प्रेस/नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. निकाल कधी लागणार यासंदर्भात महत्त्वाची माहिती शिक्षण मंडळातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
मागील वर्षी दहावीचा आणि बारावीचा निकाल हा २० मे नंतर जाहीर झाला होता. परंतु, यावर्षी दहा दिवसांपूर्वीच निकाल जाहीर होणार आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बारावीचा निकाल ९ मे रोजी तर दहावीचा निकाल १० रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.