महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! जेईई परीक्षेत राज्यातील तिघांना १०० टक्के गुण

0
184

माणदेश एक्सप्रेस/मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएचा जेईई मेन्स सेशन-२ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत, ज्यात महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिलमध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात आली होती. यावर्षी एकूण १५ लाख ३९ हजार ८४८ उमेदवारांनी अर्जक केला होता. त्यापैकी १४ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील २ लाख ५० हजार २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 

या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्यांमध्ये सर्वाधिक ७ विद्यार्थी राजस्थानचे आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रेदश येथील प्रत्येकी तीन विद्यार्थी या यादीत आहेत. तर, पश्चिम बंगाल, दिल्ली गुजरात येथील प्रत्येकी दोन आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील दोन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

परीक्षेत १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे

1) आयुष रवी चौधरी– महाराष्ट्र
2) सानिध्या सराफ– महाराष्ट्र
3) विशाद जैन – महाराष्ट्र


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here