जाणून घ्या कासवाची अंगठी घालण्याची योग्य पद्धत

0
5

वास्तू आणि ज्योतिषशास्त्रात कासव खूप शुभ मानले जाते. हे दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की कासवाची अंगठी धारण केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. पण ही अंगठी घालण्याआधी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक आहे जेणेकरुन त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया कासवाची अंगठी घालण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

अंगठी कधी घालावी?
शुक्ल पक्षातील एकादशी तिथी मंगळवारी किंवा बुधवारी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. जर एकादशीला धारण करणे शक्य नसेल तर ती शुक्ल पक्षातील कोणत्याही शुभ दिवशी धारण करता येईल.

परिधान करण्याची पद्धत
तर्जनी किंवा मधल्या बोटावर अंगठी घालावी. कासवाचा चेहरा तुमच्या दिशेने असावा. अंगठी घालताना “ओम विष्णु” या मंत्राचा जप करा.

इतर नियम
अंगठी नेहमी स्वच्छ ठेवावी. दररोज अंघोळ करताना काढावी. रसायने आणि क्लिनिंग प्रॉडक्ट्स त्यावर वापरणे टाळावे. मांस, दारू आणि लसूण-कांदा यांचे सेवन करताना अंगठी घालू नये. नकारात्मक विचार आणि राग यांपासून दूर राहावे.

कासवाची अंगठी घालण्याचे फायदे
ज्योतिषशास्त्रात कासवाची अंगठी अत्यंत शुभ मानली जाते. ही अंगठी परिधान करणाऱ्याला सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. कासव हे संयम आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. त्याची अंगठी घातल्याने व्यक्तीमध्येही हे गुण विकसित होतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठीही ही अंगठी उपयुक्त ठरते. या अंगठीमुळे जीवनातील अनेक वाईट गोष्टी जसे की ग्रह-दुष्टे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. कासवाची अंगठी प्रगतीचे मार्ग उघडण्यासाठी उपयुक्त मानली जाते. याशिवाय या अंगठीमुळे मानसिक शांती, आरोग्य लाभ आणि संपत्तीत वाढ होऊ शकते.

[टीप :वरील माहिती फक्त माहितीसाठी दिली जात आहे. माणदेश एक्स्प्रेस कोणत्याही माहितीचा दावा करत नाही.]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here