जॉब अलर्ट! आयटीबीपीमध्ये चालक पदाची भरती, दहावी उत्तीर्ण असलेल्यांना सुवर्णसंधी

0
188

 

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीपीबीमध्ये चालक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आयटीबीपी हे भारताच्या निमलष्करी दलांपैकी एक दल आहे.आयटीबीपीमध्ये कॉन्सेटबल चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. कॉन्स्टेबल चालक पदाच्या 545 जागांवर भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

आयटीपीबीच्या जाहिरातीनुसार 545 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 209 जागा असतील. तर, अनुसूचित जाती 77,अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 40, ओबीसीसाठी 164 आणि ईडब्ल्यूएससाठी 55 जागा राखीव असतील.एकूण जागांपैकी 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव असतील. आयटीबीपीमधील कॉन्स्टेबल चालक ही पदं सध्या तात्पुरत्या स्वरुपात असून पुढील काळात त्याचं रुपांतर कायमस्वरुपी पदामध्ये होऊ शकते. चालक पदावर ज्यांची निवड होईल त्यांना 21700-69100 या वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल.

शैक्षणिक पात्रता
आयटीबीपीनं निश्चित केलेल्या अटींनुसार भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवार दहावी उत्तीर्ण असलेलं आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैध अवजड वाहनं चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचं वय 21 ते 27 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना 100 रुपये भरावे लागतील. तर, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचं शुल्क भरावं लागणार नाही.

अर्ज कसा करायचा?
पात्र उमेदवारांनी आयटीबीपी कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रथम जाहिरात वाचणं आवश्यक आहे. आयटीपीबीच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावे लागतील. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांची फिजिकल इफिशियन्स टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर प्रात्याक्षिक परीक्षा होईल. हा टप्पा पार झाल्यानंतर मेडिकल टेस्ट होईल.

आयटीबीपीमधील कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात 8 ऑक्टोबरला होईल. तर, 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करता येतील. कॉन्स्टेबल चालक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना भारतात आयटीबीपीकडून जिथं नियुक्ती करण्यात येईल तिथं नोकरी करावी लागेल.

दरम्यान, आयटीबीपीची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी करण्यात आली होती. आयटीबीपीकडून लडाखमधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील जाचेप या 3488 किमी अंतराच्या भारताच्या सीमेवर सुरक्षा बंदोबस्त ठेवला जातो. आयटीबीपी गेल्या सहा दशकांपासून कार्यरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here