“चांगला रस्ता आणि सेवा पुरवली जात नसेल तर टोल घेणे चुकीचे”- नितीन गडकरी

0
5

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी खराब रस्त्यांवर टोल वसुलीवर नाराजी व्यक्त केली. त्यांचे म्हणणे आहे की, जर चांगला रस्ता आणि सेवा पुरवली जात नसेल तर टोल घेणे चुकीचे आहे. एका कार्यक्रम दरम्यान त्यांनी टोल प्लाझावर लागणाऱ्या टॅक्स वर चिंता व्यक्त केली. माहिती मिळाली आहे की, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे NHAI नवीन व्यवस्था अंतर्गत टोल गेट काधनून टाकण्याची तयारी करीत आहे.

सॅटेलाईट बेस्ट टोलिंग वर आयोजित वर्कशॉप मध्ये सहभागी झालेले गडकरींनी टोलटॅक्सवर मनमोकळेपणाने चर्चा केली. ते म्हणाले की, ‘जर तुम्ही चांगली सेवा देऊ शकत नसाल तर टोल चार्ज करायला नको, आपण युजर्स फी घेणे आपल्या हिताची रक्षा करणे यामुळे टोलिंग करण्याकरिता घाईत असतो. जेव्हा एखाद्या रस्त्याची स्थिती चांगली नसते तेव्हा माझ्याजवळ तक्रारी येतात.’

तसेच ते म्हणाले की, जिथे तुम्ही चांगल्या प्रकारचे रस्ते बनावत आहात तिथे तुम्ही युजर फी घ्यावी. जर तुम्ही खराब रस्ते असतांना टोल घेत असाल तर तुम्हाला लोकांचा नाराजीचा सामना करावा लागेल.

तसेच गडकरी म्हणाले की, वैश्विक नेविगेशन उपग्रह प्रणाली वर आधारित इलेक्ट्रिनिक्स टोल संग्रह लागू झाल्यावर देशामध्ये एकूण टोल संग्रह कमीतकमी 10,000 करोड रुपये पर्यंत वाढेल. भारतामध्ये एकूण टोल संग्रह वर्षाला आधारावर 35 प्रतिशत वाढून वित्त वर्ष 2023-24 मध्ये 64,809.86 करोड पर्यंत पोहचला होता. या महिन्याच्या सुरवातीला एनएचएआई ने राष्ट्रीय राजमार्गांवर उपग्रह आधारित इलेक्ट्रॉनिक्स टोल संग्रहच्या कार्यान्वयसाठी जगभरात रुचीपत्र आमंत्रित केले गेले होते.