हवाई दल प्रमुखांनी घेतली पंतप्रधानांची भेट

0
86

माणदेश एक्सप्रेस न्युज

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्या नंतर भारताने विविध पातळ्यावर पाकिस्तानची कोंडी केली आहे. पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यापूर्वी नौदल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. नौदल प्रमुख अॅडडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींची लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हेही या बैठकी सहभागी झाले होते.

 

दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर काल (दि.४ मे) हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची उच्चस्तरीय बैठकही झाली. यानंतर सरकारने सैन्याला कारवाई करण्याची मोकळीक दिली.

 

गुप्तचर संस्थांच्या अहवालात आधीच म्हटले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी १९ एप्रिलच्या सुमारास हल्ला करण्याची योजना आखत होते. यानुसार श्रीनगरभोवती सुरक्षा वाढवण्यात आली होती परंतु दहशतवाद्यांनी पहलगाममधील निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित करण्याची घोषणा केली. भारताच्या कठोर भूमिकेमुळे पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here