
माणदेश एक्सप्रेस न्यूज |मुंबई– Stock marketत सध्या असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही टाटा समूहाच्या टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड – टीटीएमएल (TTML) या कंपनीने गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा देत एक मल्टीबॅगर शेअर ठरला आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरने तब्बल २,९०० टक्के परतावा दिला असून, जर एखाद्या गुंतवणूकदाराने १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याची किंमत २९ लाखांहून अधिक झाली असती!
गुरुवारी या शेअरने जवळपास ८ टक्क्यांची वाढ नोंदवत ७४.७० रुपयांवर व्यापार केला. विशेष म्हणजे बुधवारीही बाजार घसरत असतानाही या शेअरने १५ टक्क्यांची उसळी घेतली होती. अवघ्या दोन ट्रेडिंग दिवसांत २८ टक्क्यांची भरघोस वाढ, तर गेल्या नऊ दिवसांत ४५ टक्क्यांची तेजी ही या शेअरची कामगिरी स्पष्ट करते.
पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये या शेअरची किंमत फक्त २.६५ रुपये होती. आज तोच शेअर ७९.४५ रुपये गाठताना दिसतो. या कालावधीत टीटीएमएलने गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला आहे.
आज बीएसईवर सकाळी ९.२७ वाजता सेन्सेक्स ०.८५% घसरून ८०,९००.६२ अंकांवर असतानाही टीटीएमएलने तेजी कायम राखली. NSE आणि BSE वर मिळून तब्बल ३२.३६ लाख शेअर्सची उलाढाल झाली, जे सरासरी व्यवहाराच्या दुप्पट आहे.
दरम्यान, टाटा सन्स या कंपनीचे मुख्य प्रवर्तक असून, टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड (TTSL) या मूलभूत कंपनीला केंद्र सरकारकडे मार्च २०२६ पर्यंत १९,२५६ कोटींची AGR रक्कम भरायची आहे. त्यामुळे भविष्यात नवीन गुंतवणुकीची शक्यता वर्तवली जात आहे.