
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन साडेतीन महिन्यांचा काळ उलटून गेला तरी प्रशासनातील खांदेपालट काही थांबताना दिसत नाही. गेल्याच आठवड्यात राज्यातील सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आताही पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत
सांगली महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांची बदली विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर येथे सदस्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर पालघर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी एच पालवे यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ येथे व्यवस्थापक संचालकपदी करण्यात आली आहे. मनोज रानडे यांची बदली पालघर सीईओ म्हणून करण्यात आली आहे.
2020 बॅचच्या मध्य प्रदेश कॅडरच्या आयएएस अधिकारी अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्यात आलं असून त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.