‘या’ जिल्ह्यातील 15 गावे पाण्यात बुडाली, पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

0
446

महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाऊस आणि पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नागपूरसह विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. पूर्व विदर्भात मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक नदी नाले तुंबले असून नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. यासोबतच अनेक गावांचा मुख्य शहरांशी संपर्क तुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे जवळपास 15 गावे पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी खोलवर शिरले आहे.

पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना त्रास होत आहे. त्याचबरोबर पर्यटननगरी लोणावळ्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. लोणावळा व परिसरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. या पाण्यामुळे माळवली परिसरातील एका बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. नंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

तसेच पुण्यात गुरुवारी (25 जुलै) रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पाऊस आणि पावसाशी संबंधित घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. पुण्यातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शहरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. सततच्या पावसामुळे शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवस यांनी दिले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here