विराट कोहली टीम इंडियासाठी एवढे दिवस खेळणार. वाचा सविस्तर

0
129

माणदेश एक्सप्रेस न्यूज : विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत खेळेल असा अंदाज आहे. म्हणजेच दोन वर्षे वनडे क्रिकेट खेळणार आहे

 

2027 वनडे वर्ल्डकप संपल्यानंतर विराट कोहली क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वनडे वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ 27 वनडे सामने खेळणार आहे. म्हणजेच फक्त 27 दिवसांसाठी टीम इंडियासाठी खेळेल.या वर्षी टीम इंडिया बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. तर 2026 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

 

27 सामन्यांपैकी 18 सामने हे भारतात होणार आहेत. याचा अर्थ पुढील दोन वर्षात विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये 18 सामने खेळेल. दरम्यान, भारताच्या वनडे वर्ल्डकप संघाची रुपरेषा 2026 नंतर ठरेल.
विराट कोहलीला या 27 सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर त्याला वनडे वर्ल्डकप 2027 संघात स्थान मिळेल. त्यामुळे विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here