
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर सारख्या दुष्काळी भागाला मंजूर करून राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी दुष्काळी भागाचा कलंक पुसला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे अभ्यासू नेते असून त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विनंतीला मान देऊन विद्यापीठ उपकेंद्राबाबतचा ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल खानापूर विधानसभा मतदार संघाचे नेते तथा सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी महायुती सरकारचे आभार मानले. शिवाजी विद्यापीठाची उपकेंद्र खानापूर ला मंजूर केल्याबद्दल निर्णायक भूमिका बजावणारे मतदार संघाचे नेते ब्रम्हानंद पडळकर यांचा सत्कार खानापूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
महायुती सरकारच्या माध्यमातून दुष्काळी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार संघाचे नाव असलेल्या खानापूर या ठिकाणी विद्यापीठाची उपकेंद्र खेचून आणण्यामध्ये गोपीचंद पडळकर यांचा सिंहाचा वाटा आहे ही बाब आता लपून राहिलेली नाही.
येणाऱ्या काळामध्ये खानापूर नगरपंचायत हद्दीमध्ये वाड्यावास्त्यावरील प्रभागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लवकरच विद्यापीठ तातडीने सुरू करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचे मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन याबाबतची मागणी करणार आहे. विद्यापीठ उभारणीसाठी तातडीने पावले उचलावीत, विद्यापीठ उपकेंद्रामध्ये भूमिपुत्रांना न्याय आणि संधी मिळावी यासाठी भविष्यकाळात आपण काम करणारा असल्याचे सांगून विद्यापीठासाठी योगदान देणाऱ्या खानापूर येथील विद्यापीठ चळवळीच्या कार्यकर्त्यांचा सन्मान आणि सत्कार ब्रम्हानंद पडळकर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना मेजर मारुती भगत म्हणाले की विद्यापीठ उपकेंद्र म्हणजे खानापूर घाटमाथ्याच्या शाश्वत विकासाचे पहिले पाऊल आहे. अनेकांनी विकासाच्या वल्गना केल्या निवडणूका जिंकल्या. परंतु, न्याय दिला नाही. पण आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली समाज कल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी प्रभू रामचंद्रांच्या साक्षीनं दिलेला शब्द पाळला आणि विद्यापीठ उपकेंद्र खानापूरला खेचून आणले याबद्दल महायुती सरकारचे त्यानी आभार मानले.
या सत्कार सोहळ्याला खानापूर नगरपंचायतचे गटनेते मेजर मारुती भगत, माजी नगराध्यक्ष अली अकबर पिरजादे, ज्येष्ठ नेते माणिक काका भगत, विद्यापीठ चळवळीचे अक्षय भगत, ऋषी देसाई, विठ्ठल भगत, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे, लाला ठोंबरे, पवन मंडले, संदीप देवकुळे, हरिश भगत, विशाल भगत, पवन भगत, पंकज भगत, अनिल भगत, सुनील भगत, किरण भगत, कुणाल भगत, गणेश भगत, आदर्श भगत, ओम बाबर, अवधूत जाधव, सागर चवरे उपस्थित होते.