टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूने सांगितले आपल्या यशाचे गुपित

0
29

भारत आणि इंग्लंड संघातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यातून स्टार फलंदाज श्रेयस अय्यर दीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात तो भारताकडून शेवटचा खेळला होता. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर, तो एकदिवसीय संघाच्या सेटअपचा एक भाग आहे. दरम्यान, त्याने आपल्या यशाचे रहस्य सांगितले आहे. यशाच्या मागे धावत नाही तर ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतो, असे तो म्हणाला.

 

श्रेयस अय्यर म्हणाला, “मी यशाच्या मागे धावत नाही. मी दैनंदिन दिनचर्या पाळतो, ज्यामुळे मला यश मिळेल. माझ्यासाठी, चॅम्पियन मी आहे. मला वाटते की हे सर्व तुमच्या मनात आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की तुमच्याशिवाय तुम्हाला साथ देणारे कोणी नाही.”

 

अय्यर पुढे म्हणाला, “मी नेहमी म्हणतो की तुम्ही वर्तमानात जगले पाहिजे. मी भाग्यवान आहे की मी २०४ मध्ये इतक्या चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. मी दररोज घेत असलेल्या मेहनतीच परिणाम मला नक्कीच मिळणार. एकूणच हा प्रवास तुम्हाला खूप काही शिकवून जातो. तुम्ही काही जिंकता, काही हरता. जर तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे धावत असाल तर ते तुम्हाला नक्कीच सापडेल, पण त्यामागे एक प्रवास असतो. तुम्ही हे एका रात्रीत साध्य करू शकत नाही.”

 

 

तो पुढे म्हणाला, “सध्या माझे संपूर्ण लक्ष एकदिवसीय मालिकेवर आहे. मी सामन्यानुसार प्रगती करत आहे. जेव्हा मी भारताची जर्सी घालतो तेव्हा मला छान वाटते. हे मला आणखी एका स्तरावर जाण्यास मदत करते. मी कधीही जुन्या गोष्टींचा विचार करत नाही.”

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here