चेहऱ्यावर अचानक मुरुमं-पुटकुळ्या वाढल्या? पावसाळ्यातला हा त्रास कमी करण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी

0
51

Mansoon Skin care : वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सतत पिंपल्स- मुरुमे येणे ही समस्या सामान्य वाटत असली तरी आपल्याला त्याचा त्रास होतो. वातावरणात बदल झाला की, त्याचा आपल्याला चेहऱ्यावर परिणाम होतो. सुंदर दिसण्यासाठी आपण त्वचेवर सतत काही ना काही लावतो पण आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, मुरुमे किंवा पुटकळ्या येऊ लागतात.

 

महागातील ब्यूटी उत्पादने, खाण्यापिण्यात कितीही बदल केला तरी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. चेहऱ्यावर अचानक पिंपल्स वाढल्याने आपल्याला सतत खाज सुटते- चेहऱ्याची आग होते, रॅशेस येतात. सध्या ऊन- पावसाच्या खेळात त्वचेचे नुकसान होत आहे. त्वचारोगतज्ज्ञ रश्मी शेट्टी यांनी आपण त्वचेची काळजी कशी घ्यायला हवी, याविषयी सांगितले आहे.

 

त्वचारोगतज्ज्ञ म्हणतात की उन्हाळ्यात त्वचेतून जास्त घाम आणि सेबम तयार होते. ज्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात आणि मुरुमे येऊ लागतात. वातावरणात आर्द्रता जास्त असल्याने त्वचा चिकट होते, ज्यामुळे घाण आणि बॅक्टेरिया त्वचेवर सहज चिकटतात. यामुळे मुरुमांची समस्या वाढते. चेहऱ्यावर आपण चुकीचे सनस्क्रीन वापरल्यास त्वचा तेलकट होते. यामुळे आणखी मुरुमे येतात. वारंवार चेहरा न धुणे किंवा मॉइश्चरायझर न लावणे यामुळे देखील त्वचेचे संतुलन बिघडते. मुरुमांची समस्या वाढते.

 

तज्ज्ञ म्हणतात त्वचेवरील मुरुमे कमी करण्यासाठी AHA आणि BHA सारखे सॅलिसिलिक ॲसिड त्वचेसाठी वापरा. ऋतुनुसार त्वचा अधिक संवेदनशील होते. त्यासाठी त्वचेवर योग्य उत्पादने वापरा. सनस्क्रीन निवडताना ती तेल-मुक्त, जेल आधारित किंवा नॉन- कॉमेडोजेनिक असायला हवी. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत नाहीत आणि मुरुमे येत नाही.
त्वचेवरील घाण आणि जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी दिवसातून दोन वेळा स्वच्छ करा. त्वचेला हायड्रेशनची आवश्यकता असते. अशावेळी त्वचेला मॉइश्चरायझर लावा. सतत घाम आल्यानंतर त्वचा क्लिन करा. बॅक्टेरिया टाळण्यासाठी आंघोळ करा. घाम आल्यानंतर त्वचा पुसताना टिश्यू पेपर किंवा रुमालाने हलक्या हाताने पुसा. जास्त जोरात पुसल्याने त्वचेला जळजळ होऊ शकते. जर आपली टाळू चिकट आणि तेलकट असेल तर त्वचेवर मुरुमे येतात. त्यासाठी टाळू निरोगी असणे महत्त्वाचे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here