विषारी अजगराबरोबर नको ती स्टंटबाजी! पायाने १५ फुट सापाला पाण्यातून बाहेर काढतोय हा माणूस, पण का? काळजाचा थरकाप उडवणारा Video Viral

0
0

भारतात कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. ‘भारत खरोखरच नवशिक्यांसाठी नाही’ हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच शेअर करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये एक माणूस एका साध्या साधनाचा आणि त्याच्या पायाचा वापर करून कालव्यातून एक मोठा अजगर बाहेर काढताना दिसत होता! हा माणूस विषारी सापाबरोबर हा जीवघेणा स्टंट करत असताना दिसत आहे आणि तिथेच पुलावर उभे राहून लोक हा प्रकार पाहत बसले आहेत. या घटनेची नेमकी तारीख आणि ठिकाण निश्चित अद्याप समजलेली नाही. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नक्की हा माणूस काय करत आहे आणि का?

 

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते एका छोट्या कालव्यावरील पुलावर खांबावर एक माणूस उतरतो जिथे उभे राहायला देखील जागा नाही. तो पुलाच्या भिंतीचा आधार घेऊन कसबसा उभा राहतो आणि पाण्यातून विषारी अजगर बाहेर काढतो. प्रथम तो साप पकडण्याचा आकडा वापरतो आणि सापाला पाण्याबाहेर ओढतो त्यानंतर पायावर सापाला पकडून ठेवतो आणि हातातील आकडा फेकून देत हातात अजगराची शेपटी पकडतो. त्यानंतर एका हातात १५ फुटाचा अजगर पकडून पुलाच्या भिंतीवर चढतो. भिंतीवर उभे राहताना त्याचा तोल जाणार असतो तो कसबसा तोल सावरतो. सापाला बाहेर काढता जमलेले लोक धावत सुटतात. तरुण तोल सावरून दोन्ही हातांनी ओढत सापाला बाहेर काढतो. थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

 

हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला, ज्यामुळे लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. बहुतेकांना हे कृत्य अनावश्यक वाटले आणि सापाच्या अधिवासात अडथळा आणल्याबद्दल त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे असे मत मांडले, तर काही लोक फक्त स्टंटमागील कारण विचारत राहिले. काहींनी असाही अंदाज लावला की, कदाचित लोक कालव्याचा वापर करत असावे, ज्यामुळे लोकांनी कालव्यातून सापाला बाहेर काढले असावे.
“आपण त्याला शांततेत जगू दिले तर ?,” असे एका वापरकर्त्याने म्हटले. “तुम्ही अशा प्राण्यांना शांततेत का सोडत नाही? असे स्टंट का?” दुसऱ्या व्यक्तीने जोडले.

 

“भारत नवशिक्यांसाठी नाही,” तिसऱ्या व्यक्तीने कमेंट केली. “मला वाटते की लोक कालव्याचा वापर करतात, म्हणूनच त्यांना अजगराचा त्रास होतो. म्हणून ते ते बाहेर काढत आहेत आणि जंगलात सोडून देतील,” चौथ्या वापरकर्त्याने म्हटले.
“त्याने अजगराला तलावातून का काढले? हे कोणत्या प्रकारचे धाडसाचे कृत्य आहे, त्याला जंगलातून काढून लोकांमध्ये टाकणे,” आणखी एकाने मत मांडले.

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here