कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती; राज्य शासनाला “एवढ्या” कोटी रुपयांचा आर्थिक फायदा

0
65

माणदेश एक्सप्रेस न्यूज|रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ३२६९.०६ मेगावॅट अवर्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. यातून राज्य शासनाला सुमारे १४४ कोटी रुपयांचा आर्थिक फायदा झाला आहे. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात सादर केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. कोयना धरणातील वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याच्या वापरातून होत असते.

 

कोयना धरणातील १०५ टीएमसी पाण्याचे वाटप कृष्णा पाणीतंटा लवादाच्या निर्णयानुसार केले जाते. यामध्ये ६७.५० टीएमसी पाणीसाठा पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी आणि ४० टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचन आणि बिगरसिंचन प्रकल्पांसाठी करण्यात येतो. पश्चिमेकडील जलविद्युत केंद्रांमधून कोळशावर वीजनिर्मिती करण्यात येते. त्यात सरासरी ४.४० रुपये दराने १४४ कोटी एवढा जास्त खर्च शासनाला करावा लागतो.

 

३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षअखेर, कोयना धरणात २३.१२ टीएमसी पाणीसाठा होता. त्यापैकी १८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. जलाशयाची पातळी २०६२.०५ मीटर नोंदवली गेली. या प्रकल्पातील जलविद्युत निर्मितीत आता चांगलीच वाढ झाल्याने राज्य शासनाला याचा फायदा झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here