शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची द्या; राष्ट्रीय समाज पक्षाचे आटपाडी तहसीलदारांना निवेदन

0
165

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : शेतकरी हा देशाचा कणा असून सध्याच्या कठीण परिस्थितीत त्यांना मोठा दिलासा मिळावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आटपाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी ठाम मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सह्या शेतकऱ्यांची दयनीय स्थिती आहे. सततचे नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, तसेच बाजारपेठेतील मंदीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर वाढला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.

 

यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष सांगली जिल्हाध्यक्ष सत्यजित गलांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक कालीदास गाढवे, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, अमर दडस, शुभम हाके, युवराज सरगर यांची प्रमुख उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here