दिघंचीत आज महालक्ष्मी पतसंस्थेच्या अध्यक्षांच्या घरावर मोर्चा ; मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

0
584

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची येथील महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी आज (दि. २० जून) ठेवी परत मिळाव्यात आणि संचालक मंडळाविरोधात फौजदारी कारवाई व्हावी या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

मोर्चा सकाळी १० वाजता दिघंची बस स्टँड येथून सुरू होऊन भाजी मंडई मार्गे महालक्ष्मी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा स्नेहल शेटे यांच्या निवासस्थानी जाणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने ठेवीदार, सभासद आणि ग्रामस्थ यांनी सहभागी होण्याचे आवाहन महेश खराडे यांनी केले आहे.

 

मोर्चाच्या माध्यमातून ठेवीदारांचे पैसे तात्काळ परत करण्याची, चुकीचे कर्जवाटप करणाऱ्या संचालक मंडळ आणि सचिव हणमंत माळी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असून, प्रशासनाने लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here