
माणदेश एक्सप्रेस न्युज|मुंबई : भारतीय जनता पक्षसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे. पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या पिढीला संजय राऊत यांनी खणखणीत टोला लगावला आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी नेहमीप्रमाणे अनेक विषयांवर बोलत चौफेर फटकेबाजी केली. तेव्हाच त्यांनी हे वक्तव्य करत पवारांच्या पक्षातील नव्या पिढीला उद्देशून हा चिमटा काढला.
शरद पवारांची जी नवी पिढी आहे, ती भाजपसोबत जाण्यासाठी व्याकूळ आहे, त्यामुळे कदाचित अजित पवाराचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपासोबत घेणं होऊ शकतं. शिवसेनेची नवी पिढी,शिंदे वगैरे भाजपसोबत गेले, तसाच निर्णय शरद पवारांची नवी पिढी देखील घेऊ शकते का असा सवाल राऊत यांना विचारण्या आला होता. शरद पवार नव्हे पण त्यांची नवी पिढी हे पाऊल उचलू शकतात का, असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊतांनी वर नमूद केलेलं उत्तर देत खोचक टोला हाणला.
सुप्रिया सुळे याचं किंवा अन्य काही नेत्यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात.त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तर त्या साागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये , की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत, तेच धडपडतायच तिथे अस्तित्वासाठी, नवी जाऊन काय करणार असा थेट सवालही राऊतांनी विचारला.