खरसुंडीत शोककळा! दुचाकी अपघातात खरसुंडीतील एकाचा दुर्दैवी अंत

0
771

माणदेश एक्सप्रेस न्यूज

तासगाव : आटपाडी – खरसुंडी येथील ७२ वर्षीय बालेखान गुलाब तांबोळी यांचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा दुर्दैवी अपघात तासगाव तालुक्यातील कवठेएकंद परिसरात झाला. अपघातात त्यांची पत्नी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यावेळी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,  बालेखान तांबोळी हे खरसुंडी गावात राहणारे असून तेथे त्यांचा वडा-पाव विक्रीचा गाडा आहे. ते सांगली येथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी पत्नीसह दुचाकीवरून निघाले होते. परंतु तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे अपघात घडला. समोरून येणाऱ्या गाडीने अचानक ब्रेक दाबल्याने त्यांनी दुचाकी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तोल सांभाळण्यात अपयश आलं आणि त्यांची दुचाकी डंपरखाली गेली.

या अपघातामुळे बालेखान तांबोळी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्याने तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिचे उपचार सुरू आहेत. मृत्यू आणि जखमीपणाची बातमी कळताच खरसुंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अपघातामुळे रस्त्यावर झाल्यामुळे वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती. सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून देण्यात आले आहे, विशेषत: दुचाकीस्वारांनी सावधगिरी बाळगावी, असे सांगण्यात आले आहे. बालेखान तांबोळी यांच्या निधनामुळे खरसुंडी परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here