
माणदेश एक्सप्रेस न्यूज :- देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या ICICI बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बचत खात्यांसाठी (Saving Account) लागू असलेल्या किमान शिल्लक (Minimum Balance) ठेवण्याचे नियम आता बदलले असून, नवीन नियमांनुसार खातेदारांना अधिक मोठी रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे. या नियमाचं उल्लंघन झाल्यास ग्राहकांना थेट दंड (Penalty) आकारला जाईल.
महानगर व शहरी शाखा :
पूर्वी – ₹10,000 (काही ठिकाणी ₹5,000)
आता – दरमहा सरासरी ₹50,000 ठेवणे बंधनकारक.काही शहरांतील शाखा :
पूर्वी – ₹5,000
आता – दरमहा सरासरी ₹25,000 ठेवणे बंधनकारक.ग्रामीण शाखा :
पूर्वी – ₹5,000
आता – दरमहा सरासरी ₹10,000 ठेवावी लागणार.
👉 हा नियम नवीन ग्राहकांसाठी लागू राहणार आहे.
बचत खात्यातील शिल्लक जर ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल, तर बँक ग्राहकांच्या खात्यातून स्वयंचलितपणे दंडाची रक्कम कपात करेल.
हा दंड शाखेच्या स्थानानुसार आणि खात्याच्या प्रकारानुसार वेगवेगळा असू शकतो.
उदाहरणार्थ, जर तुमच्या खात्यावर ₹1,000 दंड ठरवलेला असेल आणि तुम्ही शून्य शिल्लक असताना ₹5,000 जमा केले, तर बँक थेट ₹1,000 वजा करून फक्त ₹4,000 शिल्लक ठेवेल.
ग्रामीण आणि सामाजिक स्तरावरील काही योजनांमध्ये अजूनही शून्य बॅलेन्स सुविधा उपलब्ध आहे.
प्रधानमंत्री जनधन योजना खाते
ग्रामीण बँक खाते
सहकारी बँक खाते
👉 या खात्यांमध्ये पैसे शिल्लक नसले तरीही कोणताही दंड आकारला जाणार नाही.
बँकेकडून आलेले SMS आणि ईमेल नेहमी वाचावे.
खात्यात नेहमीच किमान शिल्लक ठेवण्याची खबरदारी घ्यावी.
बँक खाते बंद करण्याची वेळ आल्यास बँक प्रथम खातेधारक किंवा नॉमिनीशी संपर्क साधते, त्यामुळे वेळेवर अपडेट्सकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.