‘लाडकी बहीण योजना’त फसवणूक करणाऱ्यांवर सरकारचा धडक कारवाईचा इशारा!

0
204

माणदेश एक्सप्रेस न्यूज|मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’त फसवणूक करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या योजनेत सुरुवातीपासूनच महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला असला, तरी काही ठिकाणी खोटी माहिती देऊन लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सरकारने थेट आयकर खात्याच्या डेटाशी योजना लिंक करत फसवणूक करणाऱ्यांची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की, गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळायला हवा. अर्ज करताना खोटी माहिती देणाऱ्या महिलांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच या प्रक्रियेत इनकम टॅक्स रिटर्न्स आणि शासकीय नोकरीतील सदस्यांची माहिती तपासली जाणार आहे.

 

कोण पात्र?

अर्जदार महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी.

वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक.

महिला विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा एकल माता असावी.

घरातील कोणताही सदस्य शासकीय सेवेत नसेल.

कुटुंबीयांचा वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असावा.

अर्जदार महिला किंवा पती इनकम टॅक्स भरणारे नसावेत.

 

कोण अपात्र?

जे महिला किंवा त्यांचे पती इनकम टॅक्स भरत असतील.

ज्या घरांमध्ये सरकारी किंवा निमशासकीय नोकरी करणारे सदस्य असतील.

मोठ्या जमीनधारक किंवा उच्च उत्पन्न गटातील कुटुंब.

अर्ज करताना खोटी माहिती सादर करणारे अर्जदार.

 

या योजनेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने लाभार्थी महिलांच्या खात्यात दरमहा निधी जमा केला जातो. मात्र, चुकीच्या माहितीच्या आधारे लाभ घेतल्यास ना केवळ लाभ बंद केला जाईल, तर कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने दिला आहे.

 

सरकारची ही पावले ‘लाडकी बहीण योजना’ अधिक पारदर्शक बनवण्यासाठी असून, खऱ्या गरजू महिलांनाच मदतीचा हात मिळावा, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here