गगनयानची तारीख ठरली! यावर्षी भारताचे अंतराळात पहिले पाऊल; इस्त्रोची मोठी घोषणा

0
54

माणदेश एक्सप्रेस न्यूज |नवी दिल्ली – भारताच्या अंतराळ संशोधन इतिहासात एक नवे पर्व सुरू होणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेची अंतिम तारीख अखेर ठरली असून, २०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारतीय अंतराळवीर अवकाशात झेपावणार आहेत. अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत अंतराळात माणूस पाठवणारा चौथा देश ठरणार आहे.

 

ISRO प्रमुख व्ही. नारायणन यांनी ही माहिती देताना सांगितले की, “गगनयान मोहिमेच्या तयारीसाठी आतापर्यंत ७२०० हून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या असून अजून सुमारे ३००० चाचण्या शिल्लक आहेत. हे वर्ष या ऐतिहासिक मोहिमेसाठी निर्णायक ठरणार आहे.”

 

गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम असून, यामध्ये भारतीय अंतराळवीराला स्वदेशी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पृथ्वीच्या कक्षेत पाठवून सुरक्षित परत आणले जाणार आहे. या मोहिमेसाठी LVM3 हे मानवरहित प्रक्षेपण यान वापरण्यात येणार आहे.

 

गगनयानअंतर्गत पहिली मानवरहित चाचणी डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात येणार आहे, ज्यामध्ये “” हा अर्ध-मानव रोबोट अंतराळात झेपावणार आहे. त्यानंतर आणखी दोन मानवरहित चाचण्या होतील, ज्या मानवाच्या उपस्थितीसारख्या परिस्थितीत यंत्रणा तपासतील.

 

ISRO च्या SpaDeX मिशनने अवघ्या ५ किलो इंधनात यशस्वी डॉकिंग करत नवीन तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी केली आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. २०२५ मध्येच NASA-ISRO चा संयुक्त NISAR उपग्रह, तसेच अनेक व्यावसायिक व संप्रेषण उपग्रहांचे प्रक्षेपण देखील करण्यात येणार असल्याचेही नारायणन यांनी स्पष्ट केले.

 

गगनयान मिशन यशस्वी झाल्यास भारत अंतराळ संशोधनात नवा टप्पा गाठणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष आता ISROच्या या ऐतिहासिक मोहिमेकडे लागले असून, २०२७ मध्ये भारताचे नाव अवकाशात कोरले जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here