आटपाडीमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिमझिम

0
193

व्यवसायिक व विवाह समारंभांवर परिणाम : शेतकरी वर्ग सुखावला

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यासह शहरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. काल सकाळच्या सत्रात मोठा तर दिवसभर व रात्रीच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवस पाऊस पडत असल्याने याचा मोठा फटका शहरातील व्यवसायिकांना होत असून असून मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहेत.

 

काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी आटपाडीत पडत होत्या. विशेषतः दुपारनंतर पावसाने उग्र रूप घेतले आणि बाजारपेठेत गर्दी कमी झाली. यामुळे दुकानदार व फेरीवाले यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. अनेकांनी आपल्या दुकाने वेळेआधीच बंद केली.

 

 

याचबरोबर, लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच अशा पावसामुळे अनेक विवाह समारंभांमध्ये अडथळे निर्माण झाले. खुले मंडप, मांडव व्यवस्था आणि जेवणाच्या ठिकाणी पाण्यामुळे अडचणी आल्या. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला, ज्यामुळे लाईट डेकोरेशन आणि संगीत कार्यक्रमांवर परिणाम झाला. काही ठिकाणी पाहुण्यांची वर्दळही कमी झाली.

 

 

तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मात्र या पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. जमिनीत ओलावा निर्माण होत असल्याने आगामी खरिप हंगामासाठी ही सुरुवात लाभदायक ठरू शकते, असे स्थानिक कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हवामान विभागानुसार, पुढील २४ तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here