चहा हे सर्वांच्याच आवडीचं पेय. चहा अनेकांना आवडतो. भारतात एक कप चहाने भारतीयांची दिवसाची सुरुवात होते. चहा जास्त उकळला तर आणखी चविष्ट वाटतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो. “चहा उकळण्याऐवजी ब्रू करून प्यावा.”
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रू चहा म्हणजे नेमकं काय? ब्रू चहा तयार करताना गरम पाण्यात चहा पत्ती टाकावी आणि तीन मिनिटांमध्ये चहाची चव आणि सुगंध येतो.
“चहा असा पदार्थ आहे, जो सर्व भारतीयांना आवडतो. खूप जास्त उकळलेल्या मसाला चहामध्ये खूप जास्त टॅनिन असते, पण त्याबरोबरच त्यात अनेक हानिकारक घटक असतात. त्यापैकी एक म्हणजे अॅक्रिलामाइड. अशा चहाचे दीर्घकाळ सेवन इतके हानिकारक ठरू शकते की कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. उकळलेला मसाला चहा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यायला पाहिजे.”जर चहा पावडर पाण्यात उकळून घेतली तर चहा कडू होतो, त्यातील काही रासायनिक घटक नष्ट होतात.”
काळ्या चहाचे योग्य तापमान सुमारे २००-२१२°F (९३-१००°C) असते, तर कडू चव टाळण्यासाठी ग्रीन टीचे तापमान १६०-१८०°F (७१-८२°C) असावे.हर्बल चहा तयार करताना पाणी किती प्रमाणात उकळावे हे प्रकारानुसार अवलंबून आहे. चहाची चव टिकवण्यासाठी चहा पावडर योग्य प्रमाणात टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही चहाची चव वाढवण्यासाठी त्यात दूध, साखर आणि लिंबू मिसळू शकता.