
माणदेश एक्स्प्रेस न्यूज
मुंबई : भारत- पाकिस्तानमधील शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी (दि.१२) बंपर तेजी नोंदवली. आजच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल २,९७५ अंकांनी वाढून ८२,४२९ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ९१६ अंकांच्या वाढीसह २४,९२४ वर पोहोचला. सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची वाढ अनुक्रमे ३.७ टक्के आणि ३.८ टक्के एवढी राहिली. विशेष म्हणजे या तेजीमुळे दोन्ही निर्देशांकांनी १६ डिसेंबर २०२४ नंतर पहिल्यांदाच सर्वोच्च पातळीवर गाठली. तसेच ४ वर्षांतील ही सेन्सेक्स आणि निफ्टीची दुसरी मोठी तेजी ठरली.
जागतिक स्तरावरील सकारात्मक संकेतांचेही बाजाराला समर्थन मिळाले. ज्यात अमेरिका-चीनमधील टॅरिफ तणावाची तीव्रता कमी होणे आणि रशिया-युक्रेन युद्धबंदी चर्चेबाबत पुढे जात असलेल्या अनपेक्षित घडामोडींचा समावेश होता.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदीचा जोर अधिक राहिला. यामुळे बीएसई मिडकॅप ३.८ टक्के आणि स्मॉलकॅप ४.१ टक्के वाढून बंद झाला.