आटपाडी : विभूतवाडी येथे घरातील पाण्याच्या मोटारीच्या शॉक लागून एकाचा मृत्यू

0
1986

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी येथे एकाचा पाण्याची मोटर चालू करत असताना शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामुळे परिसरातून व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विभूतवाडी येथील विलास विष्णू वाघमोडे (वय ६८) कळंबोली मुंबई येथे राहण्यास आहेत. आषाडी वारी असल्याने ते गावी विभूतवाडी येथे आले होते. त्यांच्या घरी दरवर्षी दिंडी येत असल्याने सायंकाळचे जेवण त्यांच्याकडे होते. आज सायंकाळी सातच्या दरम्यान  पिण्याचे पाणी सोडण्यात आले होते.

पाणी आले असल्याचे समजताच त्यांनी घरातील पाण्याची मोटर नळाला जोडली. मोटर जोडल्यानंतर मोटारीसाठी वीज चालू करण्यासाठी ते गेले असता त्यांना त्य ठिकाणी  विजेचा शॉक लागला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सदरची घटना आज दिनांक १३ रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान घडली. त्यांच्या मृतदेहावर आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here