पूरस्थितीवर उपमुख्यमंत्र्यांचा दौरा, मदतीच्या अटी शिथिल करण्याची घोषणा

0
58

माणदेश एक्सप्रेस न्युज | सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा सुरू केला. या दौऱ्यात त्यांनी सोलापूर, बीड आणि धारवाड जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्तांना दिलासा देणारे मोठे विधान करत त्यांनी स्पष्ट केले की, मदत देताना पावसाच्या 65 मिमी च्या अटीचा विचार केला जाणार नाही.

अजित पवार म्हणाले, “पूराच्या संकटामुळे शेतकरी आणि नागरिकांवर मोठं संकट ओढवलं आहे. अशा काळात मदतीसाठी नियमांच्या चौकटीत अडकून बसणे योग्य नाही. त्यामुळे 65 मिमी पावसाची अट या परिस्थितीत लागू केली जाणार नाही. सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”


पूरग्रस्तांचे नुकसान योग्य पद्धतीने नोंदवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. ड्रोनच्या साहाय्याने पंचनामे करण्यात येणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण अधिक अचूक आणि वेगाने करता येईल.


अजित पवार यांनी सांगितले की, निधीची कमतरता भासू देणार नाही. शेतकरी, व्यापारी, लघुउद्योग आणि सर्वसामान्य नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी शासन व प्रशासन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पुढील दिवसांतील पावसाची परिस्थिती पाहून पुन्हा पुन्हा मदत दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.


पूरामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. पीकविमा, तातडीची आर्थिक मदत आणि भविष्यातील पुनर्वसन याबाबत शासन गंभीर आहे.


दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी स्पष्ट केले की, “अडचणीच्या काळात नागरिकांना एकटे सोडले जाणार नाही. सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार शासनाने केला आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here