रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, देशात सण-उत्सवांच्या काळात तिकीटांसाठी होणारी मारामारी आणि प्रचंड गर्दी टाळण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळेल आणि गर्दीचे वेगवेगळ्या दिवसांमध्ये विभाजन होईल.
योजनेच्या अटी व कालावधी
येण्याचे तिकीट 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान असावे.
परतीचे तिकीट 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान असावे.
दोन्ही तिकीट एकाच नावाने, एकाच क्लासमध्ये आणि एकाच स्टेशनांदरम्यान बुक झालेले असावे.
दोन्ही तिकीट एकाच माध्यमातून (ऑनलाईन किंवा काउंटर) बुक करणे आवश्यक.
परतीचे तिकीट बुक करताना Advance Reservation Period (ARP) नियम लागू होणार नाही.
तिकीटांमध्ये बदल अथवा रिफंडची सुविधा उपलब्ध नाही.
Flexi Fare ट्रेन्सना ही सवलत लागू होणार नाही.
रेल्वेच्या मते, या योजनेत स्पेशल ट्रेन्सचाही समावेश आहे. मात्र रिटर्न तिकीट बुक करताना इतर कोणतीही सवलत, वाउचर, पास, PTO किंवा रेल्वे ट्रॅव्हल कूपन वापरता येणार नाही.
रेल्वे मंत्रालयाने या योजनेचा व्यापक प्रचार प्रेस, मीडिया आणि स्टेशनवरील घोषणांद्वारे करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्री वैष्णव यांनी आशा व्यक्त केली की, या निर्णयामुळे सणांच्या गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे होईल आणि प्रवाशांना सहज तिकीट मिळेल.