शेतीच्या कारणावरून दाम्पत्यास मारहाण

0
357

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : नांगरेमळा ता. आटपाडी येथे डाळींब तोडण्याच्या कारणावरून दांपत्याला पाचजणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आटपाडी पोलिसात रेश्मा राजाराम शिंदे वय ३२ वर्षे रा.नांगरे मळा ता. आटपाडी यांनी फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादीत म्हटले आहे की रेश्मा शिंदे आणि पती राजाराम शिंदे शेतात डाळिंब तोडत होते. यावेळी शिवाजी गुंडा शिंदे, सुयश शिवाजी शिंदे, स्मिता शिवाजी शिंदे, साक्षी शिवाजी शिंदे, मीनाक्षी शिवाजी शिंदे (सर्व रा.नांगरे मळा आटपाडी ) यांनी बेकायदेशीर जमाव जमवत, तुम्ही डाळिंब तोडायची नाहीत. मला शेत जमिनीवरती कर्ज काढून पाहिजे असे म्हणून त्यांनी आम्हा दोघांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आवळे करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here