
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : लग्नात मानपान केला नाही, नवऱ्याने टोचून बोलत पत्नी म्हणून कधीही चांगली वागणूक दिली नाही, तसेच चार चाकी गाडी, दोन लाख रुपयांची मागणी करत कविता निलेश केंगार रा.राजेवाडी ता.आटपाडी हिचा सासरच्या मंडळीनी मानसिक व आर्थिक छळ केल्याची घटना घडली आहे. याबाबत कविता केंगार यांनी पती, सासू , सासरा व दिरा विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लग्न झालेल्या पंधरा दिवसापासून ते १ नोव्हेंबर २०२४ रोजी पर्यंत कटगुण पुसेगाव येथे फिर्यादी कविता यांना लग्नात चांगला मानपान केला नाही. टीव्ही,कुलर,वॉशिंग मशीन दिले नाही म्हणून पती निलेश रामचंद्र केंगार,सासू शोभा रामचंद्र केंगार,सासरा रामचंद्र गणपत केंगार,दिर प्रकाश रामचंद्र केंगार सर्व रा. कटगुण पुसेगाव ता. खटाव जिल्हा सातारा यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.