मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेचा विषय ठरत असून तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. जर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. “महाराष्ट्राने आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही,” असा इशारा राज्याचे कोरोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिला आहे.
“जर सरकारने योग्य काळजी घेतली नाही आणि लोकांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर कोरोना इतर राज्यांमध्ये फैलावेल तो दिवस दूर नाही,” अशा शब्दांत डॉक्टर साळुंखे यांनी गंभीरता सांगितली आहे.
सुभाष साळुंखे यांनी यावेळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं. “कोरोना व्हायरस फक्त महाराष्ट्रातच राहणार असा विचार करु नका, कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पावलं उचचली गेली नाही तर एप्रिल महिन्यात उत्तर आणि ईशान्य भारतात महाराष्ट्रासारखी परिस्थिती असेल,” असंही ते म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील लोक जणू काही कोरोना संपला आहे अशा पद्धतीने विचार करत असून वागण्यातूनही ते दिसत आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस