• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

‘तर अशा लोकांनी कोवॅक्सीन घेऊ नये’ : भारत बायोटेकचा सल्ला

tdadmin by tdadmin
January 19, 2021
in देश-विदेश
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


नवी दिल्ली : भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असंही कृष्णा म्हणाले होते. कोवॅक्सीनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना कृष्णा यांनी कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती संदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर त्यांनी सध्या कोवॅक्सीन घेऊ नये असं सांगितलं आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सीन संदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

यापूर्वी सरकारने इम्यूनो सप्रेसेंट किंवा इम्यूनो डेफिशिएन्सी असणाऱ्या व्यक्तींनाही कोवॅक्सीने घेता येईल असं म्हटलं होतं. मात्र चाचण्यांदरम्यान अशा व्यक्तींवर कोरोनाची लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचं दिसून आलं. सामान्यपणे केमोथेरपी करणारे कॅन्सरचे रुग्ण, एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडचे सेवन करणारे इम्यूनो-सप्रेस्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते.

 

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं म्हटलं आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अॅयलर्जी आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

 

कोवॅक्सीन घेतल्यानंतर कोणालाही करोना १९ ची लक्षणं दिसून आली तर त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये दिला आहे. आरटी-पीसीआर चाचणीच्या निकालांनाही पुरावा म्हणून कंपनीकडून ग्राह्य धरलं जाणार आहे. आम्ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे सल्ले दिले आहेत असंही भारत बायोटेकने स्पष्ट केलं आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

“महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे, चला, हवा येऊ द्या!” : शिवसेना

Next Post

वडिलांच्या मृत्यूनंतर कृणाल पांड्याच भावनिक पत्र

Next Post

वडिलांच्या मृत्यूनंतर कृणाल पांड्याच भावनिक पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

February 28, 2021
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

February 28, 2021
संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला “या” मंत्र्यांच्या राजीनामा कधी? भाजपकडून दबाव वाढू लागला

February 28, 2021
मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

मायावतींनी रिपाइंत यावे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करू

February 28, 2021
कोण आहेत संजय राठोड? एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून निवडणू येणार संजय राठोड यांच्याविषयी…

कोण आहेत संजय राठोड? एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून निवडणू येणार संजय राठोड यांच्याविषयी…

February 28, 2021
राजीनामा देवून भागणार नाही संजय राठोड यांना अटक करा : भाजप नेत्यांनी केली मागणी

राजीनामा देवून भागणार नाही संजय राठोड यांना अटक करा : भाजप नेत्यांनी केली मागणी

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143