• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का?” : “या” भाजप नेत्याने केला संताप व्यक्त

tdadmin by tdadmin
January 20, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. दरम्यान यावरुन भाजपा खासदार नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


“शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी मोदींनी नवे कृषी कायदे आणले आहेत. हे राजकीय आंदोलन आहे. हेच उद्धव ठाकरे प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून ५० हजार देणार बोलले होते. त्याचं काय झालं? किमान १० हजार तरी द्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचं तसंच न्याय देण्याचं कोणतंही काम सध्याचं सरकार करु शकत नाही. कारण यांच्या तिजोरीत पैसा नाही,” अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.


“सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीत. एसटीचे पगार दोन तीन महिने होत नाहीत, बेस्टचंही तसंच आहे. सरकारची अवस्था डबघाईला आली आहे. त्यामुळे आधी ते सुधारा मग रस्त्यावर या. आमचा काय रस्त्यावर येण्यासाठी नकार नाही. निदान मातोश्रीतून मुख्यमंत्री बाहेर तरी पडतील. पिंजऱ्याच्या बाहेर आल्यावर लोक मुख्यमंत्री कसा आहे हे तरी किमान पाहतील,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.


“हे राजकीय आंदोलन असून राजकीय खेळी आहे. वर्षभरात शेतकऱ्यांच्या हिताचं एकही काम या सरकारने केलेलं नाही, आता पुळका आला आहे. ते बिल शरद पवारांनी आता वाचलं असेल, यापूर्वी तेच प्रयत्न करत होते. शेतकऱ्यांना माल कुठेही विकण्याची परवानगी आहे. हे चुकीचं आहे का ? मग विरोध कशाला? धान्य आणि भाज्या मातोश्रीत नेऊन विकायच्या का? तो दरवाजा, पिंजरा बंदच असतो. मग विकायचा कुठे?,” अशी विचारणा नारायण राणे यांनी यावेळी केली.


“नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा केला असून शेतकरी खूश आहेत. फक्त राजकीयदृष्ट्या भाजपाच्या विरोधातील लोक एकत्र आले आहेत. भाजपाला जे यश मिळत आहे ते पाहवत नाही म्हणून पोटदुखीमुळे आंदोलन सुरु आहे,” असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Tags: #bjp#narayanrane
Previous Post

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली प्रकरणात दखल देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला नकार

Next Post

डोनाल्ड ट्रम्प नंतर अभिनेत्री कंगनालाही ट्विटरचा दणका ; चिडलेल्या कंगनाने दिली थेट धमकी

Next Post

डोनाल्ड ट्रम्प नंतर अभिनेत्री कंगनालाही ट्विटरचा दणका ; चिडलेल्या कंगनाने दिली थेट धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात पेट्रोल डिझेल स्वस्त आहे” : संजय राऊत

“पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात पेट्रोल डिझेल स्वस्त आहे” : संजय राऊत

February 26, 2021
अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुतर्फे समन्स

अभिनेता ऋतिक रोशनला मुंबई क्राईम ब्रांचच्या सीआययुतर्फे समन्स

February 26, 2021
‘शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज नाहीत केवळ बातम्या’ : फडणवीस

‘शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज नाहीत केवळ बातम्या’ : फडणवीस

February 26, 2021
“काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य” : भाजपची गृहमंत्र्यांवर टीका

“काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य” : भाजपची गृहमंत्र्यांवर टीका

February 26, 2021
काय चुक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची ?

काय चुक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची ?

February 26, 2021
महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : मंत्री विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : मंत्री विजय वडेट्टीवार

February 26, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143