सांगली : लॉकडाउनच्या काळात महावितरण कंपनीकडून भरमसाठ वीज बिल होते. परंतु, महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना तातडीने वीज बिल भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडण्यात येतील, असा इशारा दिला आहे.
महावितरणाच्या या भूमिकेवरून पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टींनी त्याला प्रत्युत्तर दिली. कोरोना लॉकडाउनमधील विज बिल माफ करण्याची मागणी करत वीज कनेक्शन तोडू देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.
‘हिंमत असेल तर ऊर्जा मंत्र्यांनी घरगुती वीज कनेक्शन तोडून दाखवावे, दोन हात करायला आम्हीही तयार आहोत’ असा शब्दांत राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. त्याचबरोबर ‘मंत्र्यांनी सुद्धा राज्यात दौरा करून सर्वसामान्यांची वीज बिलाबाबत असणारी परिस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
