सांगली : स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्राने मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत.
काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत असून राज्याची लोकसंख्या १२.३० कोटी असून राज्यात सध्या ऍक्टिव्ह रुग्ण ४. ७३ लाख आहेत त्यामुळे लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याची केंद्राची जबाबदार असताना केंद्राने केवळ ८५ लाख लसी दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील केंद्र सरकारवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी मनात शंका आहे.
महाराष्ट्राला ८५ लाख लसी मिळाल्या आहेत मात्र महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १२.३० कोटी तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास ४.७३ लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात ८० लाख लसी तिथे लोकसंख्या ६.५० कोटी आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास १७ हजार.
देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात, मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते अशी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस