मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणाबाबतचा अहवाल सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल. त्यांनी केवळ या अहवालावर सही करायला लावली असेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँगेसचे आमदार रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना टोला लगावला आहे.
राज्याच्या मुख्य सचिवांनी दिलेला अहवाल मंत्र्यांनी तयार करुन त्यावर मुख्य सचिवांनी केवळ स्वाक्षरी केल्याचं काही अनुभवी नेत्यांचं म्हणण आहे. म्हणून भाजप सरकार असताना अशाच प्रकारे अहवाल तयार होत होते का?, असा प्रश्न मला पडला. पण हे सरकार व मुख्य सचिव असं करणार नाही याची मला खात्री आहे, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
मुख्य सचिवांच्या अहवालातील अनेक बाबी धक्कादायक आहेत. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच ‘फोन टॅपिंग’चं षडयंत्र रचण्यात आलं काय, अशी शंका या अहवालावरून येतेय. तसंच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय गोळ्या झाडण्याची अशी प्रथा पडली तर भविष्यात प्रशासनाला काम करणंही अवघड होईल, अशी भीती पवारांनी व्यक्त केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस