नवी दिल्ली : द्वेष पसरवणारे ट्विटर अकाऊंट्स बंद करण्याविषयी केंद्र सरकारकडून ट्विटरला नोटीस पाठवण्यात आली होती. ट्विटरने दखल न घेतल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. यानंतर ट्विटरने केंद्र सरकारच्या नोटिसीला उत्तर दिले आहे.

केंद्र सरकारकडून सुचवण्यात आलेले ५०० हून अधिक अकाऊंट्स ब्लॉक केल्याचे ट्विटरने नोटिसीला उत्तर देताना सांगितले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आयटी अॅक्ट कलम ६९ अ (३) नुसार पाठवलेल्या नोटिसीत ज्या ट्विटर हँडल्सचा उल्लेख केला आहे. त्या संबंधित अकाउंट्सची तपासणी करण्यात येईल, असे ट्विटरकडून सांगण्यात आले.
सार्वजनिक द्वेष व तणावाचे वातावरण बिघडू नये, यासाठी या सूचनांचे पालन करणे ट्विटरला बंधनकारक आहे. ट्विटरवर ‘प्रेरणा मोहीम’ आणि पंतप्रधान मोदींबाबत हॅशटॅगचा वापर ‘असभ्य भाषा, चिथावणी आणि तणाव निर्माण करण्यासाठी’ केला जात आहे, असे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर यांनी ट्विटरच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. सरकारने दिलेल्या निर्देशानंतर ट्विटरने ५०० हून अधिक अकाउंट्स बंद केली आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
