नवी दिल्ली : चिनी सैनिकांसोबत लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर अॅपबंदीची भारताने घेतलेली भूमिका अजून कठोर केली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी जूनच्या अखेरीस ज्या २६७ चिनी अॅीप्सवर कारवाई केली होती, त्यामध्ये यांचाही समावेश होता. केंद्र सरकारने आयटी कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत चिनी अॅप्सविरोधात कारवाई केली होती. भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मकता तसेच सुरक्षेला या अॅप्सकडून धोका असल्याचे सांगण्यात आले होते.
काही चिनी अॅप्सवर तात्पुरत्या स्वरुपासाठी भारताने बंदी घातली होती. पण ५९ चिनी अॅप्सवर आता कायमची बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये TikTok, Baidu, WeChat, UC Browser, Club Factory, Mi Video Call आणि BIGO Live अशा अनेक मोठ्या अॅप्सचा समावेश आहे.
डेटा गोळा करणे, त्याची प्रक्रिया, सुरक्षा असे अनेक प्रश्न माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने उपस्थित केले होते. कंपन्या यांची उत्तर देण्यात असमर्थ ठरल्याने कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अॅंप्समध्ये SHAREit, Likee, Weibo आणि शाओमीच्या Mi Community यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस
