• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 7, 2021
in महाराष्ट्र
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण तापलं आहे. या प्रकल्पावरुन जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. स्थानिकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे.

‘महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही. या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं रास्त होतं. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती जी काही प्रमाणात तेव्हा रास्तही ठरली. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. त्यामुळेदेखील काही भूमिपुत्र चिंतेत होते. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज यावर मार्ग काढणं आवश्यक आहे,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

‘या प्रकल्पाच्या विरोधात काही स्थानिकांची असलेली भावना लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसकट सर्व राजकीय पक्ष त्यांच्या पाठी उभे राहिले होते. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज एकही नवा उद्योग अथवा एकही परदेशी गुंतवणूक महाराष्ट्राबाहेर जाणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. अन्यथा ‘औद्योगिकरणात अग्रेसर महाराष्ट्र’ ही राज्याची ओळख पुसायला वेळ लागणार नाही.

‘विकासाचं एक वेगळं मॉडेल आपल्याला जगासमोर ठेवणं शक्य आहे. नियती अशी संधी क्वचितच देते ती गमावू नये ही कळकळीची विनंती. असा प्रकल्प फक्त कोकण किंवा एखाद्या भागालाच उपयुक्त ठरेल असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला समृद्ध करू शकेल. देशाला अभिमान वाटावा असा हजारो वर्षांचा नैसर्गिक आणि जैविक संपदेचा वारसा कोकण किनारपट्टीला लाभला आहे. गाडगीळ समितीच्या अहवालात म्हटल्याप्रमाणे पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा विकास कसा साधता येईल आणि निसर्गाची हानी न होता उद्योग आणि प्रकल्प उभे करून स्थानिक तरुणांची प्रगती कशी होईल याचा विचार करून सरकारने धोरण ठरवायला हवं हे मी आपल्याला सुचवू इच्छितो,’ असंही राज यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्याचा भाजपात प्रवेश

Next Post

“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

Next Post
“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

“देशातील तरुण आणि सजग नागरिकांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे” : रोहित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 312,000

ताज्या बातम्या

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

IPL 2021 : RR vs PBKS T20 ; दीपक हुडाची फटकेबाजी ; राहुल ची तुफानी खेळी ; राजस्थान समोर पंजाबचे तगडे आवाहन

April 12, 2021
होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन :  जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

होमआयसोलेशन नियमांचे उल्लंघन : जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल ; प्रशासन गंभीर

April 12, 2021
सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

सांगली जिल्ह्यात रेमडेसिव्हरच्या थेट विक्रीस बंदी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी ; कोवीड हॉस्पिटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक

April 12, 2021
चिंता वाढली : देशात कोरोनाचे दीड लाखावर नवीन रुग्ण

आटपाडी तालुक्यात आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे २२ नवे रुग्ण ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा

April 12, 2021
“खरा शिवसैनिक हा दुसरं काही करेल पण बाळासाहेब ठाकरेंची खोटी शपथ घेणार नाही” : संजय राऊत

अरे सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघतो, पण…

April 12, 2021
BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

BIG BREAKING : दहावी, बारावीची परीक्षा लांबणीवर ; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143