• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

सरकारला बारवाल्यांची जास्त चिंता आहे का? : भाजपा नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल

tdadmin by tdadmin
January 29, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : सर्वसामान्यांसाठी अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबई लोकल सेवा पुन्हा सुरू होणार आहे. ठाकरे सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा दिला आहे. कोरोनामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती, पण काही ठराविक वेळेत १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यावरुन भाजपा नेते राम कदम यांनी तर बोचरी टीका करत सरकारला बारवाल्यांची जास्त चिंता आहे का? असा स्पष्ट सवाल केला आहे.

 

जर मुंबई लोकल सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने पाच महिन्यांपूर्वी घेतला असता तर लाखो लोकांना होणारा त्रास वाचला असता. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या त्यादेखील वाचल्या असत्या. पण सरकारच्या निष्काळजीपणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मंदिरे उघडण्याआधी बार उघडण्यासाठी परवानगी देणारे सरकार सामान्य प्रवाशांना रात्री साडे नऊनंतर लोकल प्रवासासाठी परवानगी देत आहे. साडे नऊनंतर लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की बारवाल्यांना? असा सवाल राम कदम यांनी केला.


नक्की कोणाची चिंता महाराष्ट्राच्या सरकारला आहे. जनतेची की बारवाल्यांची? सर्वसामान्य जनतेला सरकारच्या अशा निर्णयांमुळे सातत्याने विविध संकटांचा सामना करावा लागत आहे आणि त्रास भोगावा लागतो आहे. त्यामुळे हे सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत गंभीर कधी होणार? असा सवाल राम कदम यांनी केला

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

सरकारच्या निष्काळजीपणामुळे लाखो लोकांना नुकसान झालं , दूर राहणाराच्या नोकर्‍या गेल्या , बदल्यांच्या पाठी मागे लागलेले हे सरकार , जनतेच्या प्रति गंभीरता कधी दाखवणार ? @OfficeofUT @CMOMaharashtra

— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) January 29, 2021

Tags: #bjp#ramkadam
Previous Post

आटपाडी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर ; कोणत्या गावात कोणते आरक्षण, वाचा बातमी सविस्तर

Next Post

भाजप आणि मनसेची युती होणार? : यावर प्रवीण दरेकर म्हणाले…

Next Post

भाजप आणि मनसेची युती होणार? : यावर प्रवीण दरेकर म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

अखेर दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

February 26, 2021
आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

February 26, 2021
आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

February 26, 2021
आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

February 26, 2021
“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

February 26, 2021
“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

February 26, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143