अडलेड – ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी भारताच अंतिम ११ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. यष्टीरक्षक रिषभ पंतला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या लोकेश राहुललाही अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही.
सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना यावेळी दिवस-रात्र पद्धतीने खेळवला जाणार आहे. डे-नाईट कसोटीसाठी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल, तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांच्याबरोबर हनुमा विहारी संघात असेल.
यष्टीरक्षणासाठी अखेर वृद्धिमान साहा, फिरकीची धुरा रविचंद्रन अश्विन, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसोबत उमेश यादव वेगवान गोलंदाजी करतील.
पहिल्या कसोटीसाठीचा भारतीय संघ
पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



