• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

‘आम्ही ठरवलं तर तुमच्यापेक्षा जास्त राजकारण खेळू शकतो’ : संजय राऊत

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन by माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन
March 23, 2021
in महाराष्ट्र
0
‘आम्ही ठरवलं तर तुमच्यापेक्षा जास्त राजकारण खेळू शकतो’ : संजय राऊत
0
SHARES
95
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

 

 

नवी दिल्ली : परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बचा मुद्दा भाजपकडून राष्ट्रीय स्तरावर उचलण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. परमबीर सिंह यांच्या पत्रावरुन लोकसभा आणि राज्यसभेत भाजपच्या खासदारांनी थयथयाट केला. मात्र, नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना आयपीएस अधिकारी संजीव भट आणि अधिकारी शर्मा यांनी तत्कालीन सरकारवर अशाच गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. त्यांची ही पत्र आम्ही समोर आणली तर भाजपचे नेते असाच थयथयाट करायला तयार आहेत का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट आणि शर्मा यांनी तत्कालीन गुजरात सरकारवर असेच लेटरबॉम्ब टाकले होते. यानंतर संजीव भट यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हा भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. आम्ही ही पत्र समोर आणली तर कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपचे नेते त्यावर कारवाईची मागणी करतील का? भाजप महाराष्ट्रासाठी एक न्याय आणि गुजरातसाठी दुसरा न्याय, का लावत आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारीला नागपुरात होते की मुंबईत असा सवाल विचारल्यानंतर संजय राऊत चांगलेच वैतागले. राज्य सरकारने तारखांची माहिती द्यायला वेगळा विभाग सुरु केलाय का? शरद पवार जे बोलले ते पूर्ण अभ्यास करुनच बोलले. ते लॉजिकल आहे. 15 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात अनिल देशमुख सक्रिय नव्हते. त्यामुळे या सगळ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपचे नेते गुजरातमध्ये एक न्याय लावतात तर इतर ठिकाणी वेगळा न्याय लावतात. अधिकाऱ्याने लिहलेले पत्र म्हणजे पुरावा नाही. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मात्र, भाजप सोयीचे राजकारण करु पाहत आहे. आम्ही ठरवलं तर तुमच्यापेक्षा जास्त राजकारण खेळू शकतो, असा इशाराही यावेळी संजय राऊत यांनी दिला.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Previous Post

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदलाची चिन्हं ; देशमुखांकडे गृहमंत्रिपदाऐवजी दुसरे खाते

Next Post

“मंत्रिमंडळात कोणत्याही फेरबदलाची आवश्यकता नाही” : जयंत पाटील

Next Post
“मंत्रिमंडळात कोणत्याही फेरबदलाची आवश्यकता नाही” : जयंत पाटील

“मंत्रिमंडळात कोणत्याही फेरबदलाची आवश्यकता नाही” : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 311,497

ताज्या बातम्या

“महाराष्ट्रात आता लोकशाहीऐवजी ‘लॉकशाही’ चालू आहे” : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका

“महाराष्ट्रात आता लोकशाहीऐवजी ‘लॉकशाही’ चालू आहे” : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका

April 12, 2021
…तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश : संजय राऊत

…तर सर्वात आधी हे केंद्र सरकारचं अपयश : संजय राऊत

April 12, 2021
भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराचे कोरोनामुळे निधन

April 12, 2021
रोहित पवारांनी खुलासा करावा नाही तर…

रोहित पवारांनी खुलासा करावा नाही तर…

April 12, 2021
14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? : लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? : लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

April 12, 2021
भाजपकडून आपले तिकीट 6 वेळा कापल्याचा अमित शाहांचा खुलासा

भाजपकडून आपले तिकीट 6 वेळा कापल्याचा अमित शाहांचा खुलासा

April 12, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143